मेळघाटातील अति दुर्गम गावात पारंपरिक वीज उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- मेळघाटातील अतिदुर्गम 28 गावांतील नागरिकांना सध्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोताद्वारे वीज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांना पारंपरिक पद्धतीने शाश्वत स्वरुपात वीज निश्चितपणे देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील 28 गावांत महाऊर्जामार्फत अपारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच महावितरणद्वारे 24 गावांना पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर कऱण्यात आला आहे. त्यातील दोन गावांना वन विभागाची परवानगी मिळाली आहे. उर्वरित 22 गावे वन्यजीव विभागात येत असल्यामुळे त्यांचे वन्यजीव संवर्धन आणि वनसंवर्धन कायद्याच्या अंतर्गत सुधारित प्रस्ताव बनविण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, तेथील वन्यजीव आणि पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने नॅरो गेजचे ब्रॉडगेज करण्याचा विचार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देश विघातक मार्गाकडे नेण्याचे नियोजनपू्र्वक काम सुरू आहे - डॉ. नितीन राऊत

Fri Mar 24 , 2023
नागपूर :- देशात लोकशाहीच्या नावाखाली लोकसभा सचिवालयाने नियमाचा आधार घेत कमालीची तत्परता दाखवत राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. देश विघातक मार्गाकडे नेण्याचे नियोजनपू्र्वक काम सुरू आहे, विचारांचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे सध्या देशात लोकशाही नसून हुकूमशाही आहे, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अशी टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com