नागपूर :- आपली पावन दीक्षाभूमी हे जागतिक स्तरावर समतेचे, बंधुत्वाचे, आणि परिवर्तनाचे महान प्रतीक आहे. विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
आता रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव दीक्षाभूमी मेट्रो स्थानक असे बदलले पाहिजे. हा केवळ नावाचा बदल नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि अभिमानाचा सन्मान असेल आणि सर्व अनुयायांना देखील दिक्षाभूमीला येताना अत्यंत सोईचे होईल.
चला तर मग, आपण सर्वजण १४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीवर एकत्र येऊ आणि आपल्या दीक्षाभूमी नामकरणसाठीचा आवाज उठवू या.