कुही च्या धर्तीवर कामठीत एमआयडीसी निर्माण करा – सुरेश भोयर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- एकेकाळी कामठी कुही विधानसभा मतदार संघ अस्तित्वात होते व त्यावेळी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे ह्या या कामठी कुही मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत होते कालांतराने या विधानसभा मतदार संघात बदल करून कामठी विधानसभा मतदार संघातून कुही वगळून मौदा व नागपूर ग्रामीण जोडण्यात आले.सद्यस्थितीत हा कामठी मौदा विधानसभा मतदार संघ नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदार संघ मानला जातो.

एकेकाळी कामठी विधानसभा मतदार संघात समावेशक असलेल्या कुही तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविली ज्यामुळे कुही तालुक्यातील बेरोजगरीवर अंकुश लागून रोजगाराचे साधन निर्माण होतील तर कामठी तालुक्यात शहराचा विस्तार हा मोठ्याप्रमाणात वाढत असून बेरोजगारांची फौज कायम आहे तेव्हा येथील बेरोजगारिवर अंकुश लागून रोजगाराचे साधन निर्माण व्हावे यासाठी शासनाने पुढाकार घेऊन कुहीत निर्माण होणाऱ्या एमआयडीसी च्या धर्तीवर कामठीत ही एम आय डी सी निर्माण करण्याच्या मागणिला हिरवी झेंडी द्यावी अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.

नागपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी तालुक्यात शैक्षणिक प्रगती अग्रक्रमावर असल्यामुळे सुशिक्षित विद्यार्थ्यांची संख्या तसेच कुशल कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परंतु त्यांना रोजगार संधीची उपलब्धता अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे.कामठी तालुक्यात उद्योगांना आवश्यक असलेल्या दळणवळणाच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.त्यामुळे कामठी तालुक्यात एम आय डी सी सुरू झाल्यास काही प्रमाणात बेरोजगारीस आळा घालण्यात मदत होईल.

कामठी शहराची स्थापना ही इंग्रज राजवटीत झाली असून तालुकादर्जाप्राप्त कामठी शहर हे नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाते.स्वातंत्र्य नंतर या शहरातील नागरीकानी आपला परंपरागत बिडी आणि विणकाम सुरू ठेवून त्यावर उदरनिर्वाह सुरू ठेवला.कालांतराने हे दोन्ही व्यवसाय आता काळाआड झाले आहेत तसेच या शहरातील मिनी एमआयडीसी असलेल्या रामगढ जवळील औद्योगिक क्षेत्रातील जुने व्यवसाय हे मोडकळीस आले असून या व्यवसायिक इमारती जीर्ण झाले आहेत तसेच या कंपन्यांच्या जुन्या विस्तारित पडक्या जागेवर शहरातील धनदांडग्यांची नजर असून हे धनदांडगे कसेबसे ही जागा ताब्यात घेत आहेत. मात्र येथील विस्कटलेली औद्योगिक व्यवस्था, येथील बेरोजगारी लक्षात घेत स्थानिक शासन प्रशासनाने पुढाकार घेतल्यास या मोडक्या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल मात्र याकडे लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने कामठी शहरातील औद्योगिक विकास अजूनही शून्य आहे.

पूर्वीच्या काळी कामठी शहरातील नवीन कामठी असलेल्या रामगढ , आनंद नगर ,अनाज गोदाम जवळील भागात सर्वच उद्योग सुरू असल्याने या परिसराला औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख होती.या परिसरात गोंडवाना पेंट, डिस्टमपर, बाबा रोलिंगस मिल, दाल मिल, टाईल्स कंपनी ,संजीव बिडी उद्योग,गोल्डन बिडी ऊद्योग, रॉकेट बिडी उद्योग,यांसारखे उद्योग होते .कालांतराने सारे उद्योग एकापाठोपाठ बंद गेले. मात्र आजही या बंद उद्योगाचे अवशेष आजही येथे बघावयास मिळतात..

येथील नागरिक दशकाहून अनेक दशके बिडी आणि कापड उद्योगाशी जुळलेले होते मात्र आता दोन्ही उद्योग या शहरातून हद्दपार झाले आहेत..

एक काळ असा होता की येथे हातमागावर विणलेले कपडे विदेशात जात असे मात्र आता या उद्योगांना पुनररुज्जीवित करण्याची गरज आहे.कामठी तालुक्यात अशा बहुतेक जागा लिज संपलेल्या आहेत .त्या मोकळ्या जागेवर येथील धनदंडग्याचा ताब्यात जाण्यापेक्षा ही जागा शासनाने ताब्यात घेत तेथे टेक्स्टाईलस झोन बनवावे, ज्यात कापड निर्माण, प्रोसेसिंग सोबतच आंतररराष्ट्रीय स्वरूपाची कापडाची बाजारपेठ येथे निर्माण केली जाऊ शकते यामुळे व्यापार व्यवसाय वाढून बेरोजगारांची समस्या नष्ट होऊ शकते तसेच शिल्लक काही जमिनीवर इतर उद्योगही उभारले जाऊ शकतात .या शहरात स्थानिक लोकप्रतिनिधो व शासन प्रशासनाचे कुठलेही नियोजन नसून अक्षम्य दुर्लक्ष असल्याने कामठी शहरात बिनधास्त पणे अतिक्रमण वाढत आहे त्याचबरोबर शहरातील बेरोजगाराची फौज सुद्धा हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढत आहे.तेव्हा कुही च्या धर्तीवर कामठी शहरात एम आय डी सी निर्माण करण्याला मंजुरी द्यावी अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अविनाश पोईनकर यांच्या 'सुरजागड : विकास की विस्थापन ?' पुस्तकाचे प्रकाशन

Tue Apr 1 , 2025
– गडचिरोलीतील खाणींचा समाजजीवनावरील परिणामांचे संशोधन आले पुढे चंद्रपूर :- चंद्रपूर येथील प्रथितयश युवा लेखक, संशोधक, मुक्त पत्रकार अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ या बहुचर्चित संशोधन पुस्तकाचे नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित समता महोत्सवात प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध अर्थतज्ञ व अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोरचे प्रा.नीरज हातेकर, जनतेचा महानायकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते सुनील खोब्रागडे, भटक्या-विमुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!