कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या लढाईत व्यापारी संघटनेचे सहकार्य अपेक्षित

-त्रिसुत्री पालन आवश्यक  

नागपूर,दि,25: कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये व्यापारी संघटनेने अपेक्षित सहकार्य केले आहे, असे सहकार्य ओमिक्रॉन कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. अजूनही काही दुकानदार व त्यांचे मालक विनामास्क दुकानात वावरतांना दिसतात. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही असे वागणे म्हणजे या लाटेस प्रोत्साहनच आहे. सर्व व्यापाऱ्यांनी याची दखल घेऊन दुकानात आलेल्या ग्राहकाचे स्वागत करुन त्यांना मास्क लावण्याविषयी प्रोत्साहित करावे. त्याच बरोबरच ग्राहकांना मोफत मास्कचे वितरण करुन सेवा व उदारतेच्या दृष्टीकोनातून या लढाईत सहभागी व्हावे, तरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले.

            कोरोनासंदर्भात व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल, पोलीस उप अधीक्षक संजय पुरंदरे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, व्यापारी संघटनेचे प्रदीप खंडेलवाल, राजीव जैस्वाल,अश्वीन मेहाडिया,चंद्रशेखर शेगावकर, दिपेन अग्रवाल, प्रताप मोटवाणी, राजेंद्र कावडकर, रजवंतसिंग तुली, सुभाष मंगताणी, रामअवतार तोतला,आलोक संघवी, संजय नाबीस तसेच टास्क फोर्सचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

जे दुकानदार कोरोना नियमावलीचे पालन करणार नाहीत, त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल. मास्क व सॅनिटाईझरचा वापर त्याचबरोबर सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन आवश्यक असून त्यामुळेच आपण या लाटेपासून सुरक्षित राहू शकणार आहोत, असे डॉ. राऊत म्हणाले. ज्याचे अजूनपर्यंत लसीकरण झाले नाही त्यांनी तत्काळ लसीकरणाचा डोस घ्यावा. स्वत: काळजी घ्या व दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा, असे त्यांनी सांगितले.

            जगात काही देशात मास्क लावणे बंद केले आहे परंतु अशा अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अंगिकार करावा.  नागपूरच्या सुरक्षितेसाठी मास्क लावा अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई सामोरे जा, असे आवाहन त्यांनी केले. मंगल कार्यालयात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच लग्न कार्य करतांना स्वत: काळजी घेणे फार गरजेचे आहे, असे विनंती वजा आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

 बुस्टर डोससाठी पात्रताप्राप्त नागरिकांनी लसीकरण करावे. ही परिस्थिती नियंत्रणात येताच सर्व काही मोकळे करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यापारी संघटनेने रामअवतार, तोतला,श्री.अग्रवाल,राजीव जैस्वाल, तुली यांनी याविषयी जनजागृती आवश्यक असून काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. शाळा,कोचीन क्लास आदीबाबत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सर्वसमावेशक, सुलभ सहभाग लोकशाही बळकटीकरणासाठी आवश्यक

Tue Jan 25 , 2022
–  राष्ट्रीय मतदार  दिवस उत्साहात –  स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार  नागपूर,दि,25: सर्वसमावेशक, सुलभ सहभाग लोकशाही बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. मतदान करुन  लोकशाही मजबूत करु व देशाची प्रगती घडवू या, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी येथे केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार व राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आर. विमला, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com