विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

गडचिरोली :- विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेवुन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास यादीसह प्रस्ताव सादर करावे. विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे. या उददेशाने राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज भटक्या जमाती-क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात किमान 10 कुटुंबासाठी सामुहिक वसाहत योजना राबवुन अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यासाठी सक्षम अधिका-यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे 100 रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर, भुखंड असल्याचा पुरावा, नमुना-8 किंवा 7-12 उतारा दस्त नोंदणीची प्रत, घराचे सद्यास्थितीचे छायाचित्र, ग्रामसभेचा ठराव, अर्जदाराचे आधार ओळखपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, जॉबकार्ड, घरकर पावती आदी कागदपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे. अधिक माहितीकरीता 07132-222192 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळा

Thu Jun 13 , 2024
यवतमाळ :- प्रकल्प संचालक आत्मा व राष्ट्रीय बियाणे निगमच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कंपन्यांच्या संचालकांना तज्ञांद्वारे विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे उ‌द्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे तनवीर मिर्झा यांनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी चालवावी यासंदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com