-कृषीभूषण संजीव माने  लक्षणीय ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान नागपूर : ऊस पिकामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भरभराट झाली. विदर्भातही एकरी शंभर टनाच्यावर उत्पन्न घेतले जाऊ लागले आहे. लाभाची निश्चित हमी असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस शेतीची कास धरावी. हाच शेतकऱ्यांच्या शाश्वत समृद्धीचा महामार्ग असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण संजीव माने यांनी आज येथे केले. अॅग्रोव्हिजनच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात ऊस […]

-रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी -सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध -कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-   मुंबई -राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील […]

नागपुर – नागपुरातील भरतवाडा, पुनापूर भागात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामात शिस्त यावी,अर्धवट कामे जी कासवगती ने सुरू आहेत, त्यामुळे सतत होणाऱ्या दुर्घटना, कामाच्या जागी सुरक्षा रक्षक नसणे व सुरक्षेविषयीचे कुठलेही नियम कंत्राटदाराकडून न पाळणे,काम करणाऱ्या कंत्राटदाराना याविषयी सांगूनही सुधारणा न होणे, त्यांची वाढती मुजोरी, एक काम पूर्णत्वास नसतांना दुसऱ्या बाजूला काम सुरू करून अर्धवट अवस्थेत सोडून देणे या सर्व […]

कन्हान : –  परिसरात राष्ट्रसंत गाडगे संत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रसंत गाडगे गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार, माल्यार्प ण, पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत राष्ट्र  संत गाडगे संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.              कन्हान शहर विकास मंच       […]

नागपूर – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रा तेली समाज जोडो व ओबीसी जागृती अभियान 29 डिसेंबरला नागपूर शहरात दर्शन व स्वागत सोहळा ओबीसी घटकात येणारा तेली समाज महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर असून विविध पोटजाती व गटागटामध्ये विखुरलेल्या तेली समाजाला संघटित करण्यासाठी ‘‘समाज जोडो अभियान ’’ आणि वर्तमान स्थितीत ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी […]

 Mumbai –   The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the occasion of Christmas and New Year. In a message to the people, the Governor said,       “The festival of Christmas reminds us of the noble teachings  of charity, love, compassion and forgiveness exemplified by Jesus Christ.  May the festival of Christmas remove the darkness, despair and sorrow in […]

  -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई – सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या परोपकार, प्रेम, दया व करुणेच्या शिकवणीचे स्मरण देतो. नाताळचा पवित्र सण जीवनातील अंध:कार, निराशा व दु:ख दूर सारो व सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेवून येवो, अशी मी प्रार्थना करतो. नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२२ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल […]

 मुंबई, दि.24 : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार […]

मुंबई: महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात 23 नव्या बाधितांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच 600 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात 1 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्सची  तातडीची बैठक घेतली. टास्क फोर्सच्या बैठकीत नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी […]

भंडारा : जिल्ह्यात 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सध्यातरी कोरोनावर लस हाच एकमेव पर्याय आहे. विशेष लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा तालुक्यातील बेला व शहापूर येथील लसीकरण केंद्राला भेट देवून पाहणी केली. उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यावेळी उपस्थित होते. लसीकरण प्रलंबित असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर यावर बुधवारी राणी हिराई सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली.    सर्व कचरा हानिकारक नसतो. कचऱ्याचे अनेक प्रकार असतात. कचऱ्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे, असेही सांगितले. तसेच कचरा विलगीकरण तसेच त्याचा पुनर्वापर आणि व्यवस्थापन प्रभावी […]

  -बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाची बैठक -बालकांच्या उपचारासाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना          नागपूर : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विषाणूमुळे बाधित होणाऱ्या काही बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक सज्जता ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या […]

      मुंबई : राज्यात कृषीपंपाच्या बिलाबाबत शासन नक्कीच शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबत कृषीधोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली.             सदस्य सदाशिव खोत यांनी वीज वितरण कंपनी कृषीपंपाची भरमसाठ बिले आकारत आहे. वीज गळती रोखणे व जेवढा वीजेचा वापर आहे तेवढेच बील वीज ग्राहकांना देण्यात यावीत, कोणतीही पूर्वसूचना न देता […]

मुंबई : परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‍दिली.             राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू […]

मुंबई : औरंगाबाद येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.  सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.  श्री. सामंत म्हणाले, औरंगाबाद येथील विद्यापीठातील अनियमिततेसंदर्भात स्वतः राज्यपाल यांची भेट घेतली असून या विद्यापीठासह इतर विद्यापीठातील […]

     मुंबई : बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यीनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे.या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी  मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.            सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी ही परिक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे बॅण्ड स्टँडवरुन दिवसाढवळ्या गायब झाल्याचे 29 नोव्हेंबर, 2021 […]

   मुंबई : धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असून, सौरऊर्जेचे पंपही या योजनेअंतर्गत बसविण्यात येतात. स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सौरऊर्जेचे पंप बसवून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.             विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा समस्येबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. […]

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटूंबियांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांना राज्यशासनात विलिनीकरण करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यावर विलिनीकरणासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा सदस्य दिपक चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील मृतांच्या वारसांना मोबदला […]

नागपुर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयन (CITU) नागपूर जिल्हा येथे स्थापनेच्या अगोदर राज्यस्तरीय दूसरे अधिवेशन 8 व 9 ऑक्टोबर 2017 रोजी सातारा येथे पार पडले. संगठन नसतांना सुध्दा नवीन ओळख म्हणून प्रिती मेश्राम व पुष्पा पुट्टेवार या दोघी आशा वर्कर यांनी उपस्थित राहून महत्वाची भुमिका पार पाडली. 19 नोव्हेंबर 2017 रोजी नागपूर जिल्हा प्रथम अधिवेशन घेऊन जिल्हा कमेटी निर्माण […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.२३ डिसेंबर) रोजी ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.  याशिवाय उपद्रव शोध पथकाद्वारे प्लस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई करण्यात आली. दहा झोन अंतर्गत ५२ पतंग दुकानांची तपासणी करण्यात आली.  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com