विधानसभा प्रश्नोत्तर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरकारभार प्रकरणी कारवाई करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई :- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या बाजार समितीमधील गैरकारभार प्रकरणी शासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

पणन मंत्री रावल यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सन 2019 मध्ये निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. या संचालक मंडळापैकी काही सदस्य अपात्र ठरत असल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या संचालकाच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे या संचालकांनी बैठकीत सहभाग घेतला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संचालक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेऊ शकत नाही, असे पणन मंत्री रावल यांनी सांगितले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरकारभाराबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भूकंप बाधित गावांसाठी 'किल्लारी भूकंप पुनर्वसन व पुनर्बांधणी कार्यक्रम’- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

Tue Mar 18 , 2025
मुंबई :- लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भूकंप बाधित गावांसाठी ‘किल्लारी भूकंप पुनर्वसन व पुनर्बांधणी कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. किल्लारी भूकंपाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. बाधित गावांचे वर्गीकरण करून अ वर्ग व ब वर्ग गावातील 37 गावाना नागरी सुविधा देण्यात आल्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!