ग्रामीण भागाचा कायापालट करणारा अर्थसंकल्प – आमदार देवेंद्र भुयार 

मुंबई :-अर्थसंकल्पात ग्रामीण भारताच्या विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच युवांसाठी 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा निर्णयही अर्थसंकल्पातून मांडण्यात आला. याव्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प तळागाळातील लोकांना आणि शेवटच्या घटकांना दिलासा देणारा असून सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा असून सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला

Wed Jul 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी तालुक्यात रोवणीला आला वेग  कामठी :- मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेल्या कामठी तालुक्यातील शेतकरी बांधवांना मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला कामठी तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून रोवणीची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी धावपळीत लागला. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने धोका दिल्याने शेतकरी बांधव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com