शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प ! 

नागपूर :-“भारत कृषीप्रधान देश आहे, मात्र या कृषीप्रधान देशात कृषीक्षेत्राचे हब बनविण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनविण्याच्या घोषणा होतात ही शोकांतिका आहे. केंद्र सरकारचा शेती क्षेत्राबाबतचा दृष्टीकोन यामधून स्पष्टपणे दिसून येतो. वास्तविक पाहता आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा वाढविली, डाळींच्याबाबतीत देश आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली. धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली. मात्र हे सर्व करत असताना, सिंचन तसेच पायाभूत सुविधांची कोणतीच घोषणा केली नाही” तसेच ते”खते, बि-बियाणे, किटकनाशके, शेती औजारे यावरती ६ टक्क्यांपासून ते ३० टक्क्यापर्यंत जीएसटी लावण्यात आलेली आहे. यामधून जीएसटी करामध्ये सवलत देवून शेती व्यवसायाला बुस्टर डोस देण्याची गरज होती. एकीकडे वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, केंद्र सरकारचे आयात निर्यातीबाबतचे अस्थिर धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशभरातील शेतकरी पिचलेला आहे”

– देवेंद्र भुयार माजी आमदार मोर्शी विधानसभा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Feb 3 , 2025
▪️ एम्स येथील आदिवासींच्या आरोग्यावर जागतिक परिषदेचा समारोप ▪️ पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण ▪️ सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त  ▪️ आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी  नागपूर :- एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!