संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या दूषित पाणी पूरवठ्यामुळे 500 च्या आत रुग्ण अतिसार,टायफाईड,उलटी, हगवण ला बळी पडले दरम्यान कामगार नगर रहिवासी एक 32 वर्षीय तरुणी दगावली .या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज सकाळी 11 वाजता कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांची पाहणी करून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला दरम्यान उपस्थित जलप्रदाय अभियंता अवी चौधरी यांना जलशुद्धीकरण केंद्रातील भोंगळ कारभार तडकाफडकी बंद करून यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची तंबी दिली.व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे फर्मान दिले.यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे सुद्धा सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना दुपारे ,आरोग्य कर्मचारी, सह नागरिक गण प्रामुख्याने उपस्थित होते.