संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दोन महिन्यांपूर्वी 18 व 19 जुलै 2024 ला झालेल्या अवकाळी पावसामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले.संबंधित नगर परिषद व तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नुकसानग्रस्तीच्या सर्वेक्षण अहवालात जवळपास सहा हजार नुकसानग्रस्त नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. नागरिक नुकसानग्रस्त निधीच्या प्रतीक्षेत आहेत पण अजूनही त्यांना शासकीय नुकसान निधी मिळाला नाही याची शोकांतिका आहे. तेव्हा या नुकसानग्रस्त नागरिकाना येत्या 5 दिवसात तात्काळ किमान दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान निधी वितरित करावे व शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकाना न्याय द्यावा अशी मागणी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे केली आहे.