रामगढात पाणी पेटले, संतप्त महिलांची नगर परिषदेत धडक, निवेदन सोपविले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी – प्रभाग 15 तील रामगढ भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त महिलांनी आज दुपारी नगर परिषदेत धडक देऊन भाजपा महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदन सोपविले संतप्त महिलांच्या भावना लक्षात घेऊन मुख्याधिकारी बोरकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी अवि चौधरी यांना कक्षात बोलाऊन आवश्यक निर्देश दिले.

रामगढ भागातील जवलपास 40 ते 50 घरांना गेले 5 महिन्या पासुन कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे,माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी तीनदा मुख्याधिकाऱ्याना लेखी तक्रार करून पाणी टंचाई समस्या सोडविण्याची मागणी केली होती आता उन्हाळा सुरु झाल्याने कमी दाबाच्या पाणी पुरव ठ्या मुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रिती ऊके, आकांशा राव, प्रभा गराटे, सरला रामटेके, ममता मोहड, किरण बावने, सुनिता अटराये, रेखा नारनवरे, सुमन काटे, संध्या भिमटे, वच्छला  दमाहे, ललिता काटे, ललिता भगत यांचा समावेश होता

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब ए.सी.बी. जाळ्यात 1 लाखाची लाच घेतांना अटक, तर घर झडतीत 6 लाख 40 हजारांची आढळली रोख

Thu Apr 6 , 2023
वर्धा : आज पुन्हा एका मोठ्या अधिकाऱ्याला सुमारे 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या चमुने आज सकाळी साडेअकरा वाजता ही कारवाई केली. काहीच दिवसांपूर्वी वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी विजय सहारे यांना 40 हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मोठ्या अधिकाऱ्याला […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com