उर्वरित निधी लवकरच दुष्काळ पीडीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर :- जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जमिनीचे, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 273 कोटी 10 लाख 3 हजार 109 रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांनी दिली.

जिल्ह्यास 339 कोटी 68 लाख 53 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून 80.37 टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे उर्वरित 19 टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकला नाही. येत्या दोन-तीन दिवसात दुष्काळ पीडीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

NewsToday24x7

Next Post

अमर ज्योती बुद्ध विहारात वर्षावास समापन 

Fri Oct 21 , 2022
नागपूर :- बेसा-बेलतरोडी मार्गावरील अमरज्योती नगरातील अमर ज्योती बुद्धविहारात आज वर्षावास समापन कार्यक्रम प्रसंगी भव्य संघदान कार्यक्रम व भोजन दानाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भिक्खू शांतरक्षित महाथेरो, डॉ. भदंत धम्मशोक, भिक्खु ज्ञानज्योती, भिक्खू प्रियदर्शी, भिक्खु डॉ. धम्मोदय ह्यांनी भिक्खू संघाला व उपसकांना मार्गदर्शन केले. भिक्खू जीवनज्योती, भिक्खू धम्मांकुर, भन्ते धम्मसेवक, भन्ते धम्मज्योती, भन्ते संघकीर्ती, भन्ते कात्यायन, भन्ते विनयकीर्ती, भन्ते शांतीदेव, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com