नोटबंदीचा दुखवटा अजून सरला नाही; युवकांच्यावतीने आज ‘नोटबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन – जयंत पाटील

मुंबई :- आजच्या दिवशी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘नोटाबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.

लोकांचे दरडोई उत्पन्न जे २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के होते ते २०२०-२१ मध्ये -७.३ टक्के झाले आहे. नोटबंदीमुळे सुमारे ३ कोटी लोकांनी आपली नोकरी गमावली. सध्याचा बेरोजगारीचा दर ७.७७ टक्के इतका वाढला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय २०१६ पासून कायमचे बंद झाले आहेत अशी धक्कादायक माहितीही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

मध्यमवर्गीयांच्या संसाराचा गाडा कसाबसा पुढे रेटला जातोय…आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटबंदीला श्रद्धांजली वाहून आम्ही अच्छे दिनाची वाट पाहतो आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे समाधी वॉर्ड येथे स्वच्छता

Tue Nov 8 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत योग नृत्य आझाद गार्डन टीमद्वारे सहभागी होऊन गोविंद स्वामी मंदिर समाधी वॉर्ड येथे स्वच्छता करण्यात आली.समाधी वार्ड येथे असलेले गोविंद स्वामी मंदिर हे गोंडकालिन पुरातन मंदिर आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या गोंडकालिन पुरातन मंदिराची अवस्था चांगली नाही. आझाद गार्डन योग नृत्य परिवाराच्या हे लक्षात येताच मंदिराचा कायापालट करण्याचे योगनृत्य परिवाराने ठरविले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com