राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले, राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 व्यापाऱ्याचे  पैसे लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Wed Mar 29 , 2023
 स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कार्यवाही नरखेड –  तालुक्यातील टोळीपार गावातील कापूस खरेदी विक्री करणारे व्यापारी शुभम बेलखेडे हे महाराष्ट्रसह अन्य राज्यातून कापूस खरेदी करीत असतात. या कामाकरीता दिवानजी (मॅनेजर), ट्रक चालक व क्लिनर या कामावर त्यांचे मुळ गावातील व पांढुर्णा येथील काही मुलांना ठेवले होते. कापूस खरेदी करीता नेहमी दिवानजी सोबत मोठया प्रमाणात रोख रक्कम पाठवायचे हि बाब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com