सुटीच्या दिवशीही करता येणार कराचा भरणा

६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के तर १ ते १५ मार्च ५० टक्के शास्तीत सूट

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून ही योजना सुरु झाली असून, २८ फेब्रुवारी रोजी १०० टक्के माफीची शेवटची मुदत आहे. तसेच १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार असुन मालमत्ता कराचा भरणा करण्यास शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरु राहणार असल्याने शास्तीमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी केले आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता व पाणी कराचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना मालमत्ता करावरील शास्तीत १०० टक्के सूट ६ ते २८ फेब्रुवारी तर १ मार्च ते १५ मार्च पर्यंत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सुट जाहीर करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ८० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येऊ शकतो. १०० टक्के सूट मिळविण्यासाठी कार्यालयीन वेळेत भरणा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लवकरात लवकर काढा ई-गोल्ड कार्ड अन्यथा मिळणार नाही ५ लक्ष रुपयांचा मोफत विमा

Fri Feb 10 , 2023
७२,३९४ पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ २६५१६ नागरीकांनी घेतला लाभ चंद्रपूर  :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे.चंद्रपूर मनपा क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ ३७ टक्के म्हणजे २६५१६ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com