संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात
कामठी :-देशाच्या स्वातंत्र लढयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अमूल्य असून मवाळ आणि जहाल या दोन्ही परस्पर विरोधी भूमिका असूनही नेताजींच्या सेनेने आपल्या डाव पेचानी ब्रिटिशाना स्वातंत्र देण्यास भाग पाडले असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
येथील नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती समितिच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, माजी जी प सदस्य अनिल निधान,माजी आमदार देवराव रडके, आयोजन समिति चे अध्यक्ष अजय अग्रवाल, लाला खंडेलवाल ,रणाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
नेताजीच्या आठवणी निमित्त केंद्र शासनाने नेताजी जयंती पराक्रम दिन म्हणून घोषित केला असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले,या वेळी खासगी व नगर परिषदच्या अब्दुल सत्तार फारुकी उर्दू प्राथमिक शाळाचे विद्यार्थी आकर्षक वेशभुशेत उपस्थित होते.कार्यक्रमच्या प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मान्यवरानी माल्यार्पण करून राष्ट्र ध्वज फड़काविला.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी लाला खंडेलवाल, डॉ विवेक चंदनानी, प्रदीप मिश्रा, नितेश खेतान, निरज अग्रवाल, जयप्रकाश तिवारी,अशोक अग्रवाल, रितेश चौरसिया,गोपाल चव्हान, रामजी शर्मा, सुदेश अग्रवाल, राजू भूटानी, सौरभ अग्रवाल, योगेश शर्मा यांनी सहकार्य केले.