संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- काही दिवसापूर्वी पती पत्नीत झालेल्या मतभेदातून पत्नी एकुलत्या एक पाच वर्षीय मुलाला सोडून गेल्याने पत्नीच्या विरहात पतिने आज सायंकाळी 8 वाजता पत्नीच्या साडीने गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्या करणाऱ्या पतिचे नाव अतुल गजभिये वय 40 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक त्याची पत्नी कुटुंबासह रमानगर येथे भाड्याने वास्तव्यास होते .मृतक अतुल गजभिये हा कसाबसा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता दरम्यान काही दिवसापूर्वी कुटुंबात झालेल्या मतभेदातून पत्नी घर सोडून गेल्याने पत्नीच्या विरहात पतिने गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविन्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाच्या पश्चात कुटुंबात आई,पत्नी व एकूलता एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.