अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यात सध्या संततधार पावसामुळे शेतक-यांनी भात पिकाची रोवणीला सुरूवात केली असून मोठ्या प्रमाणात शेतकरी रोवणी करित असल्याचे चित्र सध्या जिल्हात दिसुन येत आहे.
जिल्हाला धान्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण आहे. भात हे प्रमुख येथील पिक आहे.यावषी पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे कामाला वेग आलेला असुन रोवणी करिता महिलांना आर्थिक मदत होत असल्याचे महीलांनी सांगितले आहे. त्यापाठोपाठ बळी राजा सुध्दा झालेल्या मुसळधार पावसामुळे सुखावला आहे.