संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाकडून अंत्योदय राशन कार्ड धारकांना प्रति कार्ड 1 किलो साखर प्रत्येक महिन्याला देण्याचे निर्देश आहे परंतू रास्त भाव स्वस्त धान्य दुकानदार अंत्योदय कार्ड धारकांना साखर आली नसल्याचे सांगून उलट पावली परत पाठवत आहेत याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागरी सुविधा समितिच्या वतीने तहसीलदार अक्षय पोयाम यांना आज शुक्रवारी दुपारी निवेदन देऊन दोषी रास्त भाव स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाहीची मागणी केली
तहसीलदार अक्षय पोयाम यांनी पुरवठा निरीक्षक अर्चना निमजे यांना बोलावून याबाबत आवश्यक निर्देश दिले. निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात विक्की बोंबले, राजेश खंडेलवाल, जितेंद्र खोब्रागडे, दिनेश खेडकर यांचा समावेश होता.