सध्या तिघांचंच सरकार? इतरांचा शपथविधी वेटिंगवर?; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा अर्थ काय?

मुंबई :- बहुमताच्या लाटेवर स्वार होत आज महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ होत आहे. आज 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा नेत्रदीपक शपथविधी सोहळा मुंबईत होत आहे. आझाद मैदान त्यासाठी सजलं आहे. राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. या ग्रँड शपथविधीसाठी लाडक्या बहि‍णींपासून ते चहावाला आणि अनेक दिग्गजांना आमंत्रण धाडण्यात आले आहे. विरोधी पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांना आणि शिलेदारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आज भाजपाच्या गटनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतील. पण इतरांचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे याविषयीचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

Source by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री केवळ तांत्रिक व्यवस्था’ : तिघांनाही एकत्रित निर्णय घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

Thu Dec 5 , 2024
मुंबई :- ‘मुख्यमंत्री’ ही केवळ तांत्रिक व्यवस्था असून, मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी महायुती सरकारमध्ये आतापर्यंत एकत्रितपणे निर्णय घेतले आणि पुढेही राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रित निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केल्यानंतर या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!