भटके विमुक्त हक्क परिषदेला भटके विमुक्त जाती जमातीचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आश्वासन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- काल सोमवार दिनांक २०/०२/२०२३ रोजी कसबा पेठ पुणे येथे भटके विमुक्त समाजाचे मूलभूत प्रश्न जाणुन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबसे यांनी महाराष्ट्रातील समस्त भटके विमुक्त समाजाचे प्रश्न मांडले ज्यामध्ये भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण करणे ,जातीच्या प्रमाणपत्रबाबत 2008 च्या जीआर चे पुनर्जीवन करणे, इंग्लिश स्कूल मध्ये समस्त भटके विमुक्त समाजाच्या मुलांना प्रवेश देणे आदी प्रश्न आपल्या भाषणात मांडले. व मुख्यमंत्री यांना त्यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक लावावी अशी विनंती केली.

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन मानण्यात आले. या सभेत दिलीप परदेशी, प्रतिक गोसावी, नागेश जाधव, शिवाजी थिटे उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये - जयंत पाटील

Tue Feb 21 , 2023
पुणे  :- MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com