संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- पेरणी झाल्यानंतर झालेल्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले असून शेतातली पिकं बहरू लागली आहेत.
यावर्षी कामठी तालुक्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण खूपच कमी होते .कमी पावसामुळे काही ठिकाणच्या पेरण्या झाल्या तर काही ठिकाणच्या पेरण्या लांबल्या होत्या.पावसाच्या कमी अधिक प्रमानात व हुलकावणीने शेतकरी पावसाअभावी चिंतेत होते ज्यामुळे त्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती .तर मागील काही दिवसापासून सुरू झालेल्या रिमझिम व जोराच्या पावसामुळे हा पाऊस शेतकऱ्यांचा अतिशय फायद्याचा ठरला आहे.तर पावसाने शेतातील उभे पिके बहरू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरू लागले आहे.
पावसाने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com