
राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत बुधवारी (दि. २५) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अडतिसवा दीक्षांत समारंभ संपन्न झाला, त्यावेळी राजभवन मुंबई येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.
आज जग संशोधन, नवसंशोधन, इन्क्युबेशनच्या युगात प्रवेश करीत आहे. हे संशोधन विज्ञान किंवा कृषी विज्ञान या क्षेत्रातच करता येते असे नाही तर ते इतिहास, मानव्यशास्त्र यांसह सर्व शाखेत करता येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आंतर शाखीय अध्ययन तसेच विज्ञानासोबत संगीत शिकण्याची देखील संधी उपलब्ध आहे. अश्यावेळी विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप, स्वयंरोजगार या माध्यमातून नवउद्यमी झाले पाहिजे. केवळ नोकरी शोधणे हे लक्ष्य ठेवल्यास आत्मनिर्भरतेचे ध्येय गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

नव्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य प्रकल्प, कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप, सेमिनार, फिल्डवर्क, इत्यादींचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
